पुढारी ऑनलाईन डेस्क - सोनी लिव्हवरील सिरीज 'रात जवां है'चे दिग्दर्शक व प्रतिभावान अभिनेता सुमीत व्यास प्रौढत्व आणि पालकत्वाच्या रोमांचक प्रवासाला एक्स्प्लोअर करत आहेत. ही सीरीज जीवनाच्या विविध टप्प्यांच्या माध्यमातून, विशेषत: पालकत्वाचा आनंद व आव्हानांना दाखवत मैत्रीच्या नात्याला सुरेखरीत्या सादर करते. विनोद आणि हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेली ही सीरीज हसवून-हसवून लोटपोट करते.
सीरीज आणि तिच्या थीमबाबत सांगताना व्यास म्हणाले, ''अनेकदा मैत्रीबाबतच्या कथांचा शेवट विवाह किंवा कथानकामध्ये मुलांचा समावेश यासह होतो, पण ही सिरीज वेगळी आहे. ही सीरीज मैत्री जीवनातील अशा आव्हानांमध्ये देखील कशाप्रकारे कायम राहू शकते, या बाबीला दाखवते. अनेक लोकांना पालकत्वाची लवकर जबाबदारी पडल्यास मैत्री टिकवून ठेवणे कठीण जाते. कारण त्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनावर लक्ष द्यावे लागते. ख्याती आनंद-पुथरन (लेखक व निर्माता), विकी विजय (निर्माता) आणि मी अनेकदा 'रात जवां है'चा उल्लेख पालकत्वाचा 'दिल चाहता है' असा केला आहे.'
ही सीरीज हृदयस्पर्शी भावनांना सादर करते. ही सीरीज तीन मित्रांना सादर करते, जेथे ते प्रौढत्व व लवकर पालकत्वाच्या आव्हानांमधून जातात. जीवनातील चढ-उतारादरम्यान त्यांच्या दृढ नात्याला दाखवतात. यामिनी पिक्चर्स प्रा. लि. निर्मित या सीरीजची निर्मिती ख्याती आनंद-पुथरन यांनी केली आहे. या सीरीजमध्ये बरूण सोबती, अंजली आनंद व प्रिया बापट असे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.