'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत काय घडणार, जाणून घ्या  instagram
मनोरंजन

'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत स्वामी समर्थांची चमत्कारिक लीला

Jai Jai Swami Samarth | 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत स्वामी समर्थांची चमत्कारिक लीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका स्वामी समर्थांच्या जीवनातील चमत्कारिक प्रसंग आणि त्यांची अध्यात्मिक लीला उलगडण्यावर आधारित आहे. मालिकेने प्रेक्षकांच्या मनात भक्ती आणि श्रद्धेचा विशेष ठसा उमटवला असून स्वामी समर्थांच्या कथांचा गूढ आणि चमत्कारिक भाग प्रेक्षकांना आकर्षित करत आहे.

उद्याच्या भागात २० तारखेला तुम्ही पाहू शकता की, साक्षात महादेवाचे अंश असलेले कर्नाटकच्या मुरगोड गावचे स्वामीभक्त चिदंबर दिक्षित अक्कलकोटमध्ये येऊन एक महायज्ञ आयोजित करतात. या यज्ञादरम्यान एका विचित्र स्थितित मरण पावलेल्या ब्राह्मणाला स्वामी समर्थ एका विलक्षण अद्भुत लीलेने जिवंत करतात. या घटनेनंतर हा महायज्ञ कसा पूर्ण होतो याची विलक्षण भक्तिमय रंजक गोष्ट या भागात पाहायला मिळणार आहे.

'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका नित्यप्रति जास्त लोकप्रिय होत चालली आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांच्या आयुष्यातील या लीला भक्तांना नवी ऊर्जा आणि अपार श्रद्धा प्राप्त करून देत आहेत. 'जय जय स्वामी समर्थ' रोज रात्री ८ वा. वर पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT