मनोरंजन

Bhumi Pednekar : ‘आजी-आजोबा गमावल्यानंतर जयपूरशी संबंध तुटला’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नुकतीच जयपूरमध्ये शूटिंग करत होती. (Bhumi Pednekar ) तिच्या हृदयाच्या अगदी जवळ असलेल्या शहरामध्ये तिच्या बालपणीच्या आठवणी आहेत. तिच्या इन्स्टाग्रामवर भूमीने शहराबद्दलचे तिचे प्रेम आणि इतक्या वर्षांनंतर जयपूरला परत येण्याचा अर्थ काय होता हे व्यक्त केले. (Bhumi Pednekar)

भूमी म्हणाली, "जयपूर आणि माझे खूप घट्ट नाते आहे. हे शहर माझे बालपण आहे. हे माझे नानी घर आहे. इथेच मी माझ्या चुलत भावांसोबत अनेक उन्हाळे घालवले आहेत, फक्त निश्चिंतपणे खेळण्यात आणि खूप प्रेम केले. आणि नंतर मी माझे आजी-आजोबा गमावल्यानंतर , माझा शहराशी असलेला संबंध तुटला. एक कलाकार असण्याचे सौंदर्य हे आहे की तो तुम्हाला अशा ठिकाणी आणि आठवणींमध्ये परत घेऊन जातो ज्या तुम्हाला वाटले होते की तुम्ही कायमचे गमावले आहे."

ती पुढे म्हणाली, "येथे ४५ दिवस घालवल्यानंतर मला माझ्या भूतकाळाशी आणि वर्तमानाशी खूप खोलवर जोडले गेले आहे. मी या शहराचा पूर्वीसारखा अनुभव घेतला आहे आणि मी माझ्या हृदयाचा एक तुकडा इथेच परत येण्यासाठी सोडला आहे."

B

SCROLL FOR NEXT