Atal Bihari Vajpayee Birth Anniversary 
मनोरंजन

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: स्मिताचा ‘उंबरठा’ पाहून अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते “अरे बेटी, तुमने…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री स्मिता पाटील (Atal Bihari Vajpayee Birth Anniversary) म्हणजे भारतीय चित्रपटसृष्‍टीतील एक 'सोनेरी पर्व'. दूरदर्शन वृत्तनिवेदिका ते एक यशस्वी अभिनेत्री असा त्‍याचा प्नवास. स्‍मिता यांनी अभियन 'जगणं' म्‍हणजे काय? हे आपल्‍या समकालीन पिढीला शिकवलं. त्‍यामुळेच आजची पिढीही त्‍याचे स्‍मरण 'जिवंत अभिनय' याच शब्‍दांमध्‍ये करते. त्‍यांच्‍या अभिनयाने माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी प्रभावीत झाले होते. उंबरठा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी स्मिता यांना फोन करुन "अरे बेटी, तुमने हम को बहुत रुलाया।" अशी प्रतिक्रिया दिली होती. जाणून घेवूया काय आहे हा किस्सा.

उबंरठा चित्रपटाचे दिग्‍गदर्शक डॉ. जब्बार पटेल यांना फोन आला. निरोप होता की, अटलबिहारी वाजपेयी मुंबईत आहेत. त्यांना उंबरठा सिनेमा बघण्याची इच्छा आहे. त्‍यानुसार चित्रपट पाहण्याची सोय दादरच्या टीटीला ब्रॉडवे या थिएटरला झाली. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि महिलाही होत्या. उंबरठा चित्रपटाची हिंदीही कॉपी होती. त्याचं नाव होतं 'सुबह'. यावेळी जब्बार पटेल यांनी वाजपेयी यांना म्हटलं तुम्हाला मी ही फिल्म दाखवली असती. तेव्हा ते म्हणाले, "मला मराठी भाषेतील उंबरठा हाच चित्रपट पाहायचा आहे."

चित्रपट सुरु झाला. वाजपेयी यांनी संपूर्ण चित्रपट पाहिला. त्यानंतर ते जब्बार पटेल यांना म्‍हणाले, "या चित्रपटातील मुलीने मला खूप रडवलं. त्या मुलीचा मला फोन नंबर हवा आहे. ही मुलगी शिवाजीराव पाटील यांची मुलगी आहे ना? तिचा फोन नंबर असेल तर मला द्या."

जब्बार पटेल यांनी स्मिता पाटील यांना फोन लावला. "स्मिता, अटलबिहारी वाजपेयी यांना तुझ्याशी बोलायचं आहे. त्यांनी आता आपली फिल्म बघितली आहे." त्यावर स्मिता म्हणाल्या, "तू मला का सांगितलं नाहीस मी आले असते. हा संवाद झाल्यानंतर वाजपेयी आणि स्मिता यांच बोलणं सुरु झालं. त्यानंतर तब्बल अर्धा-पाऊण तास ते बोलत होते. बोलत असताना अटलबिहारी वाजपेयी स्मिता यांना पुन्हा पुन्हा म्हणतं होते, "अरे बेटी, तुमने हम को बहुत रुलाया।".जब्बार पटेल यांच्याशी बोलताना वाजपेयी म्हणाले, जब्बार या चित्रपटातील प्रभावशाली काय असेल तर ते म्हणजे या चित्रपटाचा अंतिम दृश. या दृश्यात स्मिताचे जे स्मित हास्य आहे ते खूप विलक्षण आहे.

स्मिता यांच वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झालं. एकदा जब्बार पटेल वाजपेयी यांना भेटले तेव्हा स्मिता यांची आठवण निघाली. जब्बार यांनी जेव्हा स्‍मिता पाटील यांच्‍या निधनाची बातमी सांगितली तेव्हा हळहळून वाजपेयी म्हणाले, "वह बेचारी बच्ची चली गई, उसने मुझे बहुत रुलाया।"

जैत रे जैत, उंबरठा, भूमिका, आक्रोश, अर्थ, मिर्च मसाला, मंडी, नादान, शक्ती, बाजार, शराबी, तरंग, रावण, अमृत, अनोखा रिश्ता असे एकापेक्षा एक चित्रपट स्मिता यांनी आपल्‍या अभिनयाची छाप पाडली. उण्यापुऱ्या १० वर्षाच्या आपल्या अभिनय कारकिर्दीत ८० हून अधिक एकापेक्षा एका चित्रपटात अभिनय केला होता. जैत रे जैत मधील चित्रपटातील स्मिता यांच्या गाण्याने आणि अभिनयाने सिनेरसिकांच्या मनावर छाप पाडली होती. आजही ती गाणी चाहत्यांच्या मनावर भूरळ घालून आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात बिनधास्त भूमिका केल्या. त्या खासगी आयुष्यातही तितक्याच बिनधास्त होत्या. नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, सावळं, निखळ सौंदर्य असं समीकरण असलेल्या स्मिता या नेहमीच चाहत्यांच्या आठवणीत राहतील. उण पुरं ३१ वर्ष जगलेल्या स्मिताशिवाय आज मैफिल सुनी सुनी वाटते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT