पुढारी ऑनलाईन डेस्क - अरशद वारसी एक असा अभिनेता आहे जो नेहमी स्पष्ट बोलतो. एका पॉडकास्ट मुलाखतीत, अर्शदने आपले जीवन, करिअर आणि चित्रपटांविषयी बातचीत केली. अभिनेत्याने 'कल्कि 2898 एडी' विषयीही चर्चा केली. या चित्रपटाबद्दल बोलताना त्याने अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले. तो म्हणाला, 'मी कल्कि पाहिला, मला तर आवडला नाही. पण, जेव्हा अमितजी त्यांच्या आवाजात बोलत होते, तेव्हा त्यांना मी समजू शकलो नाही. मी शपथ खातो की, जर त्यांची ताकद आम्हाला मिळाली तर लाईफ बनेल. ते कमाल आहेत.'
त्यानंतर अर्शदने प्रभास्या भूमिकेवर टीका केली. तो म्हणाला, 'प्रभास, मी वास्तवात खूप दु:खी आहे, तो एका जोकरसारखा दिसत होता. का? मी मॅड मॅक्स पाहू इच्छितो. मी तिथे मेल गिब्सनला पाहू इच्छितो. तुम्ही त्याला काय बनवलं यार. का असे करता मला समजत नाही.'
'कल्कि 2898 एडी'चे दिग्दर्शन नाग अश्विनने केलं. यामध्ये प्रभास मुख्य भूमिकेत होता. तर दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि काही साऊथ स्टार्सने कॅमियो केलं होतं. हा चित्रपट महाभारतातील कथेशी प्रेरित एका डायस्टोपियन सायस-फाय कहाणी आहे. जगभरात बॉक्स ऑफिसवर ११०० चे कलेक्शन चित्रपटाने केले आहे.
अर्शद म्हणाला, 'श्रीकांत'मधील राजकुमार रावचे कौतुक केले. 'मुंज्या' आणि 'किल' पाहता येईल, असेही म्हटले.