Tadaka Article | देवाभाऊंच्या यशाचे रहस्य 
संपादकीय

Tadaka Article | देवाभाऊंच्या यशाचे रहस्य

पुढारी वृत्तसेवा

ठाकरे भवनामध्ये सगळे भाऊ भाऊ एकत्र जमले होते. उद्धव, राज, आदित्य, अमित सगळे सगळे उपस्थित होते. विषय होता - निवडणुकीतील यशापयश : एक आत्मचिंतन! सोबत चहा, कॉफी, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे व संजूबाबा होते. सगळ्ंयाच्या चेहर्‍यावर थोड्याफार विजयाचा आनंद होता व थोड्याफार पराभवाचा विषाद होता. पण एकंदरीत वातावरण खेळीमेळीचे होते.

उद्धव : राज! तू काहीपण म्हण, ही निवडणूक खूपच त्वेषाने आणि आत्मविश्वासाने लढलो आपण!

राज : तर काय! बरेच दिवस साठवून ठेवलेला जोश असा एकदम बाहेर पडतो ना तेव्हा अणुरेणू पेटून उठतो.

आदित्य : मला तुमच्या दोघांकडे बघून कधी राहवतच नव्हते चाचू!

अमित : माझा स्वभाव थोडा शांत असल्याने मी अंतर्मुखच होतो.

उद्धव : तुला काय वाटतंय राज, अजून आपल्याला काय काय करायला पाहिजे?

राज : अरे असे आपण आग ओकतो ना तेच बरे आहे. त्यामुळे तर ते सगळे टरकून असतात आपल्याला.

अमित : खरं सांगू का? ही आग बिग सगळे बरोबर आहे. पण..

उद्धव : पण काय?

अमित : त्यामुळे मतदारपण आपणाला टरकून असतात.

संजय : मी बोलू का मध्ये?

उद्धव : हं बोला!

संजय : मला या निवडणुकीत काही साक्षात्कार झालेत.

आदित्य : हो मलाही काही साक्षात्कार झालेत.

संजय : माझं आधी ऐकून घ्या. आपण आता आपली युद्धनीती बदलली पाहिजे.

उद्धव : ती कशी!

संजय : म्हणजे देवाभाऊ पाहा कसे शांत असतात. कितीही आरोप झाले तरी शांतपणे उत्तर देतात. नेहमी विकास विकास म्हणतात. ते कमी बोलतात.

राज : म्हणजे त्यामुळेच त्यांना यश मिळाले म्हणताय?

संजय : होय. नाही तर काय?

उद्धव : बघू विचार करूया या युद्धनीतीवर! पुढच्या निवडणुकीपर्यंत बदल करू.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT