Latest

लवंगेच्या अतिसेवनाने ‘या’ दुष्परिणामांचा धोका

Arun Patil

नवी दिल्ली : आपल्याकडे अनेक प्रकारचे मसाले असतात, जे अन्नाची चवही वाढवतात आणि आरोग्यासाठी लाभदायकही ठरतात. त्यामध्येच लवंगेचा समावेश आहे. लवंगमध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मँगनीज यासारखे पोषक घटक केवळ व्यक्तीचे मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करत नाहीत, तर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासदेखील मदत करतात. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही काही लोकांनी उन्हाळ्यात लवंगाचे जास्त सेवन करू नये. याच्या अतिसेवनामुळे त्यांच्या आरोग्याला फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. कसे ते जाणून घ्या…

लवंगाच्या अतिसेवनाने रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होऊ शकते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि आधीच साखर नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत असाल, तर लवंग खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. लवंगाचा प्रभाव उष्ण असतो. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे. त्याच्या अतिसेवनाने शरीराचे तापमान वाढू शकते. लवंगाचे जास्त सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाईनल समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या, अपचन, अतिसार किंवा जळजळ आणि हार्टबर्न होऊ शकते.

लवंगाचे जास्त सेवन केल्याने किडनी आणि लिव्हरलाही नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला यकृत किंवा किडनीच्या आजाराने आधीच त्रास होत असेल, तर लवंग जास्त प्रमाणात खाणे टाळा. लवंगाच्या गरम प्रभावामुळे यकृत, मूत्रपिंड आणि पोटाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. लवंगाचे जास्त सेवन केल्याने रक्त पातळ होते आणि व्यक्तीला ब्लड थिनिंगची समस्या होऊ शकते. वास्तविक, लवंग नैसर्गिकरीत्या रक्त पातळ करण्याचे काम करते. परंतु, जर तुम्ही याचे जास्त प्रमाणात सेवन केले, तर दुखापत झाल्यास तुमचा रक्तस्राव लवकर थांबणार नाही. इतकेच नाही, तर रक्त खूप पातळ होऊ लागले की इतरही अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT