Latest

राज्यात 30 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज ; या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस वाढला असून, राज्यात पुन्हा मोठ्या पावसाचा अंदाज आहे. 27 ते 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्याला यलो अलर्ट, तर 27 व 28 रोजी दहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्राकडून दमट, तर बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे वाहत येऊन त्यांची महाराष्ट्रावर टक्कर होत असल्याने पहिल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळीने जोरदार हजेरी लावण्याचा सपाटा लावला, तो अजून सुरूच आहे.

27 ते 30 एप्रिलपर्यंत पुन्हा पाऊस वाढणार असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा बुधवारी हवामान विभागाने दिला आहे.

(यलो अलर्ट : 27 ते 30 एप्रिल) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ.

(ऑरेंज अलर्ट : 27 व 28 एप्रिल) : नाशिक, नगर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT