नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सेमी हाय स्पीड रेल्वेच्या क्षेत्रात सुरू झालेल्या 'वंदे भारत' या रेल्वेची आता नवीन आवृत्ती येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. प्रवास सुखकर आणि वेगवान व्हावा यासाठी या दुसर्या आवृत्तीत काही बदल करण्यात आले असून आता ही रेल्वे अवघ्या 140 सेकंदांत 160 किमी प्रतितास वेग घेऊ शकणार आहे. नागपूर- बिलासपूर पाठोपाठ सिकंदराबाद ते विशाखापट्टणम रेल्वे जानेवारीत सुरू होणार आहे.
दोन राज्ये जोडणार
- महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्ये वेगवान रेल्वेने जोडणार
- नागपूर-गोंदिया-दुर्ग- रायपूर-बिलासपूर हे पाच टप्पे
- दक्षिणपूर्व मध्य रेल्वे क्षेत्रातील पहिलीच वंदे भारत रेल्वे
- आठवड्यातून सहा दिवस ही रेल्वे धावणार
- अवघ्या साडेपाच तासांत कापणार 412 किमी अंतर
- सध्याच्या रेल्वे गाड्यांना लागतात सात तास
नवीन बदल
- वेग – 160 किमी प्रतितास
- एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी 360 अंश फिरू शकणारी आसने
- वेग वाढवणे व घटवणे या कामांसाठी इंटेलिजंट ब्रेकिंग सिस्टीम
- सर्व डब्यांना स्वयंचलित दरवाजे
- जीपीएसवर आधारित ध्वनिचित्र माहितीफलक
- मनोरंजनासाठी वायफाय हॉटस्पॉटची सुविधा
- विमानांसारखी आरामदायक आसन व्यवस्था
- डब्यातील उष्णतेच्या संतुलनासाठी नवीन यंत्रणा
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.