सुरत : सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या दोन वर्षे कैदेच्या शिक्षेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अपिलाची सुनावणी पूर्ण झाली असून सत्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायालय 20 एप्रिल रोजी निकाल देणार आहे.
'सगळ्याच चोरांचे आडनाव मोदी कसे', असे विधान करणार्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गेल्या महिन्यात सुरतच्या कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षे कैदेची शिक्षा सुनावली होती. गांधी यांनी सुरतच्या सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलावर मूळ याचिकाकर्त्यांचे म्हणणेही मागवण्यात आले होते. खालच्या न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली व त्यांनी आपल्या अशिलाच्या बाबतीत विनाकारण कठोर भाषा वापरण्यात आल्याचेही गांंधींच्या वकिलांनी सांगितले.