राष्ट्रीय

पतंजलीच्या पाच औषधांवरील बंदी हटवली

मोहन कारंडे

डेहराडून : पतंजलीने पहिल्यांदाच आयुर्वेद औषधांची खर्‍या अर्थाने ओळख करून दिली आहे. गेल्या 30 वर्षांपासून पतंजलीकडून हे काम सुरू आहे. उत्तराखंड सरकारने आपली चूक मान्य करत पतंजलीच्या पाच औषधांवरील बंदी हटवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आयुर्वेदाचे महत्त्व जाणले आहे.

पतंजलीने आयुर्वेदावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात संशोधन केले आहे. स्वातंत्र्यानंतर जगभरात भारतीय आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यात पतंजलीने महत्त्वाचे योगदान दिले आहे. एका अधिकार्‍याने आमच्या औषधांबाबत जे कृत्य केले, ते अत्यंत चुकीचे आहे. आयुर्वेदाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. पण ते कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. तसेच कोणी केल्यास पतंजलीकडून कायदेशीर कारवाई केली जाईल.

आयुर्वेदाला आपला धर्म मानणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. पतंजलीकडून आयुर्वेदावर सुमारे 500 संशोधकांकडून काम केले जात आहे. आयुर्वेद भारताचा प्राचीन वारसा असून त्यामुळे अनेक व्याधीवर उपचार करण्यात आले आहेत. जगभरातून आयुर्वेदाला मान्यता असताना खुद्द भारतातच त्याला विरोध होणे हे खूपच वेदनादायी आहे. आयुर्वेद हा भारताचा श्वास असून त्यासाठी सर्व काही केले जाईल आणि आयुर्वेदाचे महत्त्व अबाधित राखले जाईल, असे पतंजलीकडून सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT