नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. प्रवास योजनांमध्ये बदल करावा लागलेल्या भारतातील परदेशी नागरिकांनी व्हिसा मुदतवाढ किंवा वास्तव्य नियमित करण्यासाठी जवळच्या विभागीय परदेशी नोंदणी कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.
मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पश्चिम आशियातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे अनेकांना नियोजित प्रवास पुढे ढकलावा लागला आहे. अशा नागरिकांना भारतात कायदेशीर अडचण येऊ नये यासाठी संबंधित एफआरआरओ कार्यालय आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यास मदत करेल. संपर्क तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.