पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली सरकारच्या जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटने (GAD) अरविंद केजरीवाल यांचा 'तो' प्रस्ताव फेटाळला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जागी मंत्री आतिशी दिल्लीत स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावणार असल्याचे या प्रस्तावात म्हटलं होतं. याविषयी तिहार तुरूंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांना पत्र लिहले आहे.
दिल्लीच्या मंत्री अतिशी दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जागी ध्वजारोहण करणार होत्या. तुरुंगात असताना केजरीवाल यांनी 15 ऑगस्ट रोजी छत्रसाल स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमात आतिशी यांनी ध्वज फडकावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून मंगळवारी (दि.१३ ऑगस्ट) हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) केजरीवाल यांचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. यानंतर आता दिल्लीत स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात आतिशी यांना राष्ट्रध्वज फडकवता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रस्ताव फेटाळताना जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या सचिवांनी नियमांचा हवाला दिला आहे.
जीएडीचे अतिरिक्त मुख्य सचिव नवीन कुमार चौधरी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचना कायदेशीरदृष्ट्या अवैध असून, त्या स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत. कारागृहाच्या नियमानुसार याची परवानगी देता येत नसल्याचे स्पष्ट केले. या निर्णयानंतर आता दिल्लीत ध्वज कोण फडकवणार? असा प्रश्न दिल्लीच्या नायब राज्यपालांना विचारण्यात आले असता, त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणे टाळले आहे.
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्याबाबत उपराज्यपालांना पत्र लिहिले होते. पत्रात केजरीवाल यांनी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री आतिशी सिंह दिल्लीत ध्वजारोहण करतील असे सांगितले होते.
दिल्ली सरकारच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्यांच्या जागी अतिशीचा ध्वज फडकावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी तिहार तुरुंगातून नायब दिल्लीच्या राज्यपालांना पत्र लिहिले आहे. तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना पाठवलेल्या पत्रावर तुरुंग प्रशासनाने आक्षेप घेतला आहे.
तिहार तुरूंगातील कारागृह क्रमांक 2 च्या अधीक्षकांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी या प्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अंडरट्रायल कैदी म्हणून पत्र लिहिले. ज्यामध्ये त्यांनी हा विशेषाधिकाराचा गैरवापर केला असल्याचे म्हटले आहे. अंडरट्रायल कैदी दिल्ली जेल नियमांच्या कायदेशीर तरतुदींद्वारे नियंत्रित केले जातात. जे त्यांचे अधिकार आणि विशेषाधिकार मर्यादित करतात. तुरुंगाच्या नियमांनुसार, तुमचा संदेश तुरुंगाबाहेर संवाद श्रेणीत येत नाही.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ६ ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रातील मजकूर कोणत्याही अधिकाऱ्यांशिवाय बाहेर फुटल्याने तुरुंग प्रशासनानेही नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले. कारागृह अधीक्षकांनी मुख्यमंत्र्यांना अशा कोणत्याही अनुचित कृतीपासून दूर राहण्याचा सल्ला देत विशेषाधिकारांचा गैरवापर करू नये, अन्यथा विशेषाधिकार कमी करण्यास भाग पाडले जाईल, असे सांगितले केजरीवाल यांनी बजावले आहे.