राष्ट्रीय

महाराष्ट्रात ३० वर्ष सेवा देताय आणि तेथील पोलिसांवर विश्वास नाही? परमबीर सिंगांना तगडा झटका!

Pudhari News

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना ती फेटाळून लावली. त्यांच्याविरोधात चालू असलेल्या विभागीय चौकशी राज्याबाहेर हस्तांतरित करावे आणि केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी करावी अशी मागणी परमबीर सिंग यांनी केली होती.

कोर्टाने सांगितले की, परमबीर सिंग हे ३० वर्षांपासून महाराष्ट्र पोलिसात कार्यरत आहेत. असे असूनही, त्यांना राज्य पोलिसांवर विश्वास नाही, हे आश्चर्यकारक आहे. हे प्रकरण राज्याबाहेर पाठवावे अशी त्यांची मागणी आहे. यासह कोर्टाने म्हटले आहे की, ज्यांची घरे काचेची आहेत आहेत, ते इतरांच्या घरावर दगड फेकत नाहीत. परमबीर सिंग यांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे.

सुनावणीदरम्यान परमबीर सिंग यांचे वकील महेश जेठमलानी यांनी आरोप केला की, परमबीर यांना याचिका मागे घेण्यासाठी धमकावले जात आहे. ते म्हणाले की जर केस मागे न घेतल्यास त्यांना फौजदारी खटल्यांमध्ये अडकवले जाईल.

मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची सूचना 

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की आपण या प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा करता आणि आपणास त्वरित सुनावणी हवी असेल तर मुंबई उच्च न्यायालयात जा. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की तुम्ही आश्चर्य व्यक्त केले की तुम्ही 30 वर्षे महाराष्ट्र पोलिसात सेवा बजावली आणि आता आपल्या स्वतःच्या राज्यातील पोलिसांवर तुमचा विश्वास नाही. यानंतर कोर्टाने म्हटले की ते याचिका फेटाळून लावत आहेत. 

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके सापडल्यानंतर आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर  परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून काढून टाकण्यात आले होते. आपल्या याचिकेत त्यांनी होमगार्ड डीजी पदाच्या बदलीला आव्हानही दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT