राष्ट्रीय

Black Spot : अशा ठिकाणांना का म्हणतात ब्लॅक स्पॉट? इथून जाण्यास असतो धोका, जाणून घ्या सविस्तर

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क: ब्लॅक स्पॉट अपघाताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाण मानले जाते. अशा ठिकाणाहून प्रवास करणे म्हणजे अपघात होण्यासारखे आहे. ही ठिकाणे इतकी धोकादायक का असतात? याचे कारण काय असू शकते आणि त्यावर उपाय काय, या ठिकाणांना ब्लॅक स्पॉट्स का म्हणतात? याबद्दल आपण जाणून घेऊया.

यामुळेच होतात अधिक अपघात
जिथे दाट लोकवस्तीचा रस्ता, अशा ठिकाणाहून लोक पुन्हा पुन्हा रस्ता ओलांडतात, रस्त्याच्या बांधकामात होणारे दुर्लक्ष आणि जास्त रहदारीमुळे रस्त्याची झालेली दुरवस्था बराच काळ त्याची काळजी न घेतल्यास हा रस्ता अपघातांचे माहेरघर बनू लागल्याचेही दिसून येत.

म्हणूनच याला ब्लॅक स्पॉट म्हणतात
रस्त्याच्या विशिष्ट भागात वारंवार अपघात होत असल्यास किंवा तीन वर्षांत एकाच ठिकाणी पाच-दहा अपघात झाले, तर ती जागा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केली जाते. यानंतर या ठिकाणचे तज्ज्ञ पथक अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन त्यावर सूचना देऊन ही जागा सुरक्षित कशी करता येईल.

सरकार एक्शन मोडवर
अपघाताच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ५ लाखांहून अधिक रस्त्यावर अपघात होतात. ज्यामध्ये दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3 लाखांहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे 2024 च्या अखेरीस अपघात आणि मृतांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करणे या ध्येयाच्या दिशेने सरकार काम करत आहे. रस्ते अपघातांबाबत सरकार अत्यंत गंभीर असून राष्ट्रीय स्तरावर ब्लॅक स्पॉट्स ओळखून या स्पॉट्सपासून मुक्ती मिळवण्यात मग्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT