नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून विशेष कामगिरी करणाऱ्या सरपंचांना २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनाच्या कार्यक्रमाला केंद्र सरकारकडून विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या जलजीवन मिशन योजनांतर्गत विशेष कामगिरी करणाऱ्या महिला सरपंचांनाही आमंत्रित केले आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणाऱ्या सरपंचाचा केंद्र सरकारकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. गावचा गावगाडा चालवणाऱ्या महिला सरपंचांना देशाच्या कर्तव्य पथावर रणगाड्याचे प्रात्याक्षिक पाहायला मिळणार आहे.