नवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांनी आश्वासन दिले होते की, ते बिहारचे रस्ते हेमामालिनी यांच्या गालासारखे बनवू, पण ते तसे करू शकले नाहीत. मी तुम्हाला आश्वासन देतो, ज्याप्रमाणे मी ओखला आणि संगम विहारचे रस्ते बनवले, त्याचप्रमाणे मी कालकाजीतील सर्व रस्ते प्रियांका गांधी यांच्या गालासारखे बनवीन, असे आक्षेपार्ह वक्तव्य दिल्ली भाजपचे नेते रमेश बिधुरी यांनी केले आहे.
त्यांचा व्हिडीओ काँग्रेस नेते पवन खेडा यांनी जारी केला आहे. यावर पवन खेडा म्हणाले की, भाजपच्या या नेत्यांमध्ये संघाची मूल्ये दिसून येत आहेत. हे गैरवर्तन या स्वस्त माणसाची मानसिकता दर्शवत नाही, तर हे त्याच्या मालकांचे वास्तव दाखवत आहे.