राष्ट्रीय

आदिवासींवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार : प्रियांका गांधी-वधेरा

Arun Patil

मांडला, वृत्तसंस्था : मध्य प्रदेशात आदिवासींवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात असून भाजपकडून लूट केली जात आहे. राज्यात भाजपचे सरकार 225 महिने असून या काळात 250 घोटाळे झाल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनी केला आहे. त्यांनी काँग्रेसच्या जनआक्रोश यात्रेला संबोधित केले. त्या म्हणाल्या, मध्य प्रदेशातील सरकार बदलण्याची गरज आहे.

राज्यातून दीड लाख महिला आणि मुली बेपत्ता झाल्या. राज्यात रोज 17 बलात्काराच्या घटना घडत आहेत. आदिवासींवर होत असलेल्या अत्याचाराची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. लोकांना रोजगार मिळत नाही. भाजप सरकारचे लोक लूट करण्यातच व्यस्त आहेत. जातीनिहाय जनगणनेत ओबीसी, दलित, एससी आणि एसटीचे किती लोक आहेत, हे दिसून येईल.

केंद्रातील भाजप सरकारला याबाबत काहीच बोलायचे नाही. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना झाली. यामध्ये 84 टक्के लोक ओबीसी आणि एसटी प्रवर्गातील आहेत. ज्यांची लोकसंख्या अधिक आहे त्यांना पदे मिळत नाहीत. त्यांना न्याय द्यायचा नसल्यानेच जातीनिहाय जनगणना केली जात नाही. आम्हाला लोकांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणेची मागणी करत आहोत, असे प्रियांका म्हणाल्या.a

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT