नवी दिल्ली; वृत्तसंस्था : वाढत्या लोकसंख्येमुळे सर्व सार्वजनिक यंत्रणेवर ताण येतो. महागाई, बेरोजगारी, गरीबी, भूकबळी असे बरेच प्रश्न लोकसंख्यावाढीशी संबंधित आहेत. शहरे बकाल होतात. सरकारी योजना प्रत्येकापर्यंत पोहोचविणे कठीण होते. भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकल्याने पुन्हा एकदा लोकसंख्या नियंत्रण कायद्याची चर्चा सुरु झाली आहे.
2019 च्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकानुसार प्रत्येक जोडप्याला दोन अपत्य धोरण बंधनकारक होते.
दोन अपत्य विधेयक संसदेत 35 वेळा मांडण्यात आले. हे विधेयक 2022 मध्ये मागे घेण्यात आले.