पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक निकालात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीसाठी झंझावती प्रचार दौरा केला. प्रचार काळात त्यांनी एकुण १५१ मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेतल्या यातील ८५ मतदारसंघात भाजप प्रणित 'एनडीए'ने विजय मिळवला आहे. मागील लोकसभा निवडणुकीशी तुलना करता यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र माेदींचा विजयाचा स्ट्राईक रेट ८५ टक्क्यांवरुन ५६ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ मार्च ते ३०मे या काळात देशभरात १५१ मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यापैकी ८५ मतदारसंघात एनडीएने ८५ जागा जिंकल्या आहेत. २०१९ ची तुलना करता नरेंद्र मोदी यांचा विजयाचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. २०१९ लोकसभघ निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी १०३ मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या होत्या त्यापैकी ८६ ठिकाणी भाजपचा विजय झाला होता तर १७ जागांवर पराभव झाला होता. त्यामुळे त्याचा स्ट्राइक रेट ८५ टक्के होता. ( क्रिकेटच्या खेळात फलंदाज आणि गोलंदाजांच्या कामगिरीचे परिमाण म्हणजे स्ट्राइक रेट. क्रिकेटपटूचा बॅटिंग स्ट्राइक रेट म्हणजे फलंदाजाने केलेल्या धावाला100ने गुणायचं. याचं जे उत्तर असेल त्याला त्याने किती चेंडूमध्ये त्या धावा केल्या ते भागायचं असते. हेच सूत्र राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा आणि विजयी उमेदवाराच्या संख्येलाही लागू हाेते.)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये भाजपच्या जागांमध्ये घट झाली आहे.
उत्तर प्रदेश हे देशातील सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असणारे राज्य आहे. येथे पंतप्रधान मोदींनी सर्वाधिक जाहीर सभा घेतल्या होत्या. २३ मतदारसंघांमध्ये त्यांच्या जाहीर सभा झाल्या यातील १३ मतदारसंघांमध्ये एनडीएचा पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी उत्तर प्रदेश सभा घेतलेल्या केवळ ६ ठिकाणी एनडीएचा पराभव झाला होता. उत्तर प्रदेशनंतर मोदींनी पश्चिम बंगालध्ये सर्वाधिक जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांनी जाहीर सभा घेतलेल्या १९ मतदारसंघांपैकी 12 मध्ये भाजपचा पराभव झाला आहे. तर महाराष्ट्रात मोदींनी १८ ठिकाणी सभा घेतल्या त्यापैकी १४ मतदारसंघांमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.
राजस्थानमध्ये मोदींनी जाहीर सभा घेतल्या त्या आठपैकी केवळ तीन मतदारसंघात भाजप आघाडीला विजय मिळाला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा क्लीन स्वीप झाला असताना, पंतप्रधान मोदींनी राज्यात पाच जाहीर सभा घेतल्या होत्या.पंजाब आणि हरियाणामधून आणखी एक धक्का बसला, जिथे या निवडणुकीच्या मोसमात मोदींनी सहा जाहीर सभा घेतल्या – प्रत्येक राज्यात तीन. मात्र, त्यापैकी पाच मतदारसंघात युतीचा पराभव झाला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाच सभा होऊनही त्याचा स्ट्राइक रेट शून्य होता. तेलंगणामध्ये पंतप्रधानांनी ५ ठिकाणी सभा घेतली. या पाचपैकी तीन मतदारसंघात एनडीएचा पराभव झाला आहे. पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये १३ , कर्नाटकमध्ये ८ या २१ पैकी चार मतदारसंघात एनडीएचा पराभव झाला आहे. गुजरातमध्ये त्यांनी सहा जाहीर सभा घेतल्या. यापैकी बनासकांठामध्ये भाजपचा पराभव झाला.
पंतप्रधानांचा स्ट्राइक रेट शंभर टक्के होता, जसे की ओडिशा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, आसाम, जम्मू आणि काश्मीर आणि त्रिपुरा. या राज्यांमध्ये त्यांनी 30 जाहीर सभा घेतल्या. त्या सर्व ठिकाणी भाजप प्रणित एनडीएन आघाडीला यश मिळाले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ६६ ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. त्यापैकी ३२ ठिकाणी इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांचा स्ट्राइक रेट ४८ टक्के आहे. राहुल गांधींच्या बहुतेक जाहीर सभा रायबरेलीतील सहा आणि वायनाडमधील दोन मतदारसंघांतून ते निवडणूक लढवत होते. या दोन्ही गोष्टी त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतलेल्या 14 पैकी सहा ठिकाणी इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे. केरळमध्ये गांधींनी सात मतदारसंघात सात जाहीर सभा घेतल्या. पण त्यांचा पक्ष कोट्टायममध्ये केरळ काँग्रेसकडून पराभूत झाला आहे. तर पंजाब आणि झारखंडमध्ये राहुल गांधींनी ज्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली अशा दोन मतदारसंघात काँग्रेसचा विजय झाला. येथे त्यांचा स्ट्राइक रेट शंभर टक्के होता.
130 मतदारसंघ असलेल्या बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्या गांधींनी 14 विभागांमध्ये जाहीर सभा घेतल्या. यापैकी सहा मतदारसंघात इंडिया आघाडीचा विजय झाला आहे. तर दिल्ली, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि राजस्थानमध्ये काँग्रेस नेत्याचा ट्रॅक रेकॉर्ड खराब राहिल, जिथे त्यांनी अनेक मतदारसंघांमध्ये 14 जाहीर सभा घेतल्या. पण इंडिया आघाडीला एकही विजय मिळाला नाही.
हेही वाचा :