पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४ ऑगस्‍ट) फाळणी वेदना स्मृतिदिनानिमित्त देशाच्या फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. File photo
राष्ट्रीय

'फाळणी वेदना स्मृतिदिन' : PM नरेंद्र मोदी म्‍हणाले, "फाळणीच्या भयंकर..."

अमित शहा, योगी आदित्‍यनाथ यांनी वाहिली पीडितांना श्रद्धांजली

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (दि. १४ ऑगस्‍ट) फाळणी वेदना स्मृतिदिनानिमित्त देशाच्या फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी २०२१ मध्‍ये १४ ऑगस्ट हा दिवस 'फाळणी वेदना स्मृतिदिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. (Partition Horrors Remembrance Day)

फाळणी पीडितांच्‍या धैर्याला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस

पीएम मोदी यांनी 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'फाळणीच्या भयंकर स्मृती दिनानिमित्त, आम्हाला फाळणीच्या भीषणतेमुळे प्रभावित झालेल्या आणि पीडित झालेल्या असंख्य लोकांची आठवण येते. त्यांच्या धैर्याला श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे. हा दिवस मानवी प्रतिकार शक्ती दर्शवतो. (Partition Horrors Remembrance Day)

'फाळणीमुळे प्रभावित झालेल्या अनेकांनी आपले जीवन नव्याने सुरू केले आणि प्रचंड यश मिळवले. आज, आम्ही आमच्या राष्ट्रातील एकता आणि बंधुत्वाच्या बंधनाचे नेहमी रक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असेही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

इतिहासाचे स्‍मरण करणारा देश भक्कम भविष्य घडवू शकतो

जो देश आपला इतिहास लक्षात ठेवतो ते एक भक्कम भविष्य घडवू शकते आणि एक शक्तिशाली देश म्हणून उदयास येऊ शकते, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्‍या X' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

सत्तेच्या लालसेपोटी त्‍यांनी केले देशाचे विभाजन : योगी आदित्‍यनाथ

'फाळणी वेदना स्मृतिदिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी देशाचे विभाजन होऊ दिले. तो इतिहासातील काळा दिवस होता. हजारो वर्षांपासून एक भारत असलेला जगाचा सनातन राष्ट्र असलेला भारत प्रथम गुलाम झाला, परकीय आक्रमकांनी इथली परंपरागत संस्कृती पायदळी तुडवली, मग जे काम इतिहासात कोणत्याही युगात झाले नाही, ते सत्तेने केले. फाळणीची शोकांतिका म्हणून भुकेलेली काँग्रेस. काँग्रेसने स्वतंत्र भारताला असा अट्टाहास दिला, जो आजही दहशतवादाच्या रूपाने देशाला त्रास देत आहे.राजकीय नेतृत्वाने जिद्द दाखवली असती तर जगातील कोणतीही शक्ती या देशाचे विभाजन करू शकली नसती, असेही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

इतिहासातील एक वेदनादायक अध्याय : रिजिजू

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरवर पोस्ट केले की, लाखो लोकांची त्यांच्या घरातून हटविण्‍यात आले. अगणित जीव गमावले. ज्यांनी अकल्पनीय दुःख सहन केले त्यांच्यासाठी माझे हृदय वेदनादायक आहे. हा आमच्या इतिहासातील एक वेदनादायक अध्याय आहे. फाळणीत बलिदान दिलेल्‍यांचे स्मरण करण्यासाठी आणि आपल्या देशात एकता आणि करुणा वाढवण्यासाठी आपण एकत्र येऊ या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT