पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरच्या उखरुलमध्ये जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला करुन शस्त्रांसह दारुगोळा लुटला. या घटनेची गंभीर दखल पोलीस दलाने घेतली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी पोलीस अधिका-यांनी सांगितले की, उखरुलमधील दोन गावांतील रहिवाशांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या जमिनीच्या वादावरून तणाव वाढला आहे. गांधी जयंतीनिमित्त परिसराची साफसफाई करणाऱ्या हुंगपुंग येथील विद्यार्थ्यांना हनफुन गावातील रहिवाशांनी अडवल्यानंतर गोळीबार झाला. जमावाने थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला केला. जमावाने आठ 9 एमएम पिस्तुल, सहा रायफल, तीन एके-47 रायफल, दोन 9 एमएम कार्बाइन, एक एसएलआर, एक स्टेन गन, 340 इन्सास राउंड, AK-47 च्या 180, SLR च्या 10 , 9 एमएम पिस्तुलचे 201 राउंड घेऊन पळ काढला.