महाराष्ट्रावर वर्चस्व गाजविणारी भाजपा आणि एकसंध शिवसेना यांची इतिहासजमा झालेली युती, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत फूट पडून झालेले गट आणि महाराष्ट्रात प्रथमच पाच टप्प्यांत झालेले मतदान या पार्श्वभूमीवर NDA समोर सलग तिसर्यांदा नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार देण्याचे, तर वर्षभरापूर्वीच स्थापन झालेल्या INDIA आघाडीसमोर हा गड भेदण्याचे आव्हान होते. यांत महायुतीच सरस ठरत असल्याचे 'पुढारी न्यूज'ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये दिसते आहे.