पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या १० वर्षांत आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही तळागाळातील असंख्य प्रेरणादाई व्यक्तिमत्त्वांना सन्मानित केले आहे. भारतातील सर्वोच्च पुरस्कार विजेत्यांच्या जीवन प्रवासाने असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे. दरम्यान, देशातील तळागाळातील प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांनी 'पद्म' पुरस्कारांसाठी नामांकन करण्याचे मी आवाहन करताे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या वैयक्तिक X अकाऊंटवरून आज (दि.९ सप्टेंबर) शेअर केली आहे.
PM मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "भारतीय सर्वोच्च पुरस्कार विजेत्यांच्या जीवन प्रवासाने देशातील असंख्य लोकांना प्रेरणा दिली आहे. त्यांनी केलेल्या कामातून जिद्द, संयम आणि दृढता स्पष्टपणे दिसून येते. ही पुरस्कार प्रणाली अधिक पारदर्शक आणि अनेकांना सहभागी करण्याच्या भावनेने आमचे सरकार विविध पद्म पुरस्कारांसाठी नामांकित करण्यासाठी लोकांना आमंत्रित करत आहे."
सर्वोच्च भारतीय पद्म पुरस्कारासाठी अनेक नामांकन आले आहेत याचा मला आनंद आहे. नामांकन करण्याचा शेवटची तारीख रविवार १५ सप्टेंबर आहे. मी अधिकाधिक लोकांना प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना पद्म पुरस्कारांसाठी नामांकन करण्याचे आवाहन करत आहे, होय तुम्ही हे करू शकता, असे म्हणत पीएम मोदी यांनी प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांना विश्वासही दिला आहे.