मुंबई : भारतीय नौदलाने सोमवारी पाणबुडीविरोधी युद्धनौका माहेचा आपल्या ताफ्यात समावेश केला. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत माहे युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. माहेचा ताफ्यात समावेश केल्याने भारतीय नौदलाच्या ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे.
उल्लेखनीय म्हणजे माहे युद्धनौकेला शत्रूच्या पाणबुड्यांचे दुःस्वप्न म्हणून ओळखले जाते. ती इतके शक्तिशाली आहे की शत्रूंसाठी दुःस्वप्न ठरू शकते. माहेच्या बांधकामात 80 टक्क्यांपेक्षा जास्त स्देशी साहित्य वापरले आहे. माहेचे जलावतरण स्वदेशी उथळ पाण्यातील युद्धनौकांच्या नवीन पिढीच्या आगमनाचे चिन्ह आहे. माहे युद्धनौका डिझाइन, बांधकाम आणि एकात्मतेमध्ये भारताची वाढती कौशल्ये दर्शवितो. ती पश्चिम समुद्रकिनार्यावर मूक शिकारी म्हणून काम करेल.
आयएनएस माहेच्या जलावतरणावेळी लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले, भारतीय नौदलासाठी कोचीन शिपयार्ड लिमिटेडने बांधलेल्या आठ पाणबुडीविरोधी युद्धनौकांपैकी पहिली आयएनएस माहेच्या जलावतरण समारंभात उपस्थित राहणे ही सन्मानाची भावना आहे. स्वदेशी तंत्रज्ञान ही भारतची वाढती क्षमता आहे. त्याद्वारे लढाऊ विमानांची रचना, बांधणी आणि तैनात करण्याची क्षमता वाढली आहे. भारताच्या सागरी वारशाचे प्रतीक असलेल्या माहे या ऐतिहासिक किनारी शहराच्या नावावरून हे जहाज नावीन्यपूर्णता आणि सेवेच्या भावनेचे प्रतीक आहे.
आयएनएस माहेची प्रमुख वैशिष्ट्ये
* माहे-वर्गातील पहिली युद्धनौका : पाणबुडीविरोधी युद्धासाठी खास डिझाईन केलेले उथळ पाण्यातील जहाज.
* स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठा वाटा : संपूर्ण जहाज 80 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधलेले ‘आत्मनिर्भर भारत’चे प्रतीक.
* कोचीन शिपयार्डमध्ये निर्मिती : भारतीय नौदलाच्या गरजेनुसार देशातच विकसित आणि बांधणी.
* 78 मीटर लांबीचे शक्तिशाली प्लॅटफॉर्म : लहान आकार असूनही उच्च क्षमतांनी सुसज्ज.
* अत्याधुनिक पाणबुडी शोध प्रणाली : आधुनिक सोनार व ट्रॅकिंग तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या पाणबुड्या शोधणे, निरीक्षण करणे व निष्प्रभ करणे शक्य.
* उथळ पाण्यात ऑपरेशनची खास क्षमता : किनारपट्टीजवळ, उथळ समुद्री भागात पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी डिझाईन.
* बहुउद्देशीय मोहिमांसाठी सक्षम : समुद्री सुरक्षा, गस्ती, पाणबुडीविरोधी ऑपरेशन्स अशा अनेक मोहिमा एकाच वेळी पार पाडण्याची ताकद.
* भारतीय किनारपट्टी सुरक्षेत महत्त्वाची भर : आधुनिक धोके ओळखून त्यांना रोखण्याची भारतीय नौदलाची क्षमता वाढवते.