India Unmarried Youth Report: भारतात लग्नाचे वय सातत्याने वाढत आहे. उच्च शिक्षण, करिअरला प्राधान्य, आर्थिक स्थैर्य आणि बदलती मानसिकता यामुळे देशातील अविवाहित तरुणांची संख्या गेल्या दशकात लक्षणीय वाढली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) 'यूथ इन इंडिया' अहवालानुसार, 15 ते 29 वर्षे वयोगटातील सुमारे 23 टक्के भारतीय तरुण-तरुणी अजूनही अविवाहित आहेत.
अहवालानुसार, 2011 मध्ये 15 ते 29 वयोगटातील अविवाहित तरुणांचे प्रमाण 17.2 टक्के होते. मात्र आता ते वाढून 23 टक्क्यांवर पोहोचले आहे. यावरून भारतातील तरुणांमध्ये उशिरा विवाह करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे स्पष्ट होते.
पुरुष आणि महिलांमध्येही हा बदल दिसून येतो.
अविवाहित पुरुष: 2011 मध्ये 20.8% → आता 26.1%
अविवाहित महिला: 2011 मध्ये 13.5% → आता 19.9%
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला असता, जम्मू-काश्मीर येथे सर्वाधिक अविवाहित तरुण असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एकूण अविवाहित तरुण : 29.1%
पुरुष : 30.1%
महिला : 28.1%
या बाबतीत जम्मू-काश्मीर देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात 26.7 टक्के तरुण अजूनही अविवाहित आहेत. तर दिल्लीत हे प्रमाण 26.5 टक्के आहे. शहरी जीवनशैली, करिअरवर अधिक लक्ष आणि उशिरा विवाह करण्याचा वाढता कल यामुळे राजधानीत लग्नाचे सरासरी वय वाढत असल्याचे दिसते.
पंजाबमध्ये देखील 25 टक्के तरुण अविवाहित आहेत. परदेशात स्थलांतर आणि लिंग गुणोत्तरातील असमतोल ही यामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.
देशात सर्वात कमी अविवाहित तरुण केरळमध्ये आहेत.
केरळ – 18.3%
तामिळनाडू – 20.2%
आंध्र प्रदेश – 20.7%
हिमाचल प्रदेश – 20.8%
या राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी वयात विवाह होत असल्याचे दिसून येते.
NSO च्या अहवालात यामागील काही महत्त्वाची कारणे नमूद करण्यात आली आहेत.
उच्च शिक्षणासाठी अधिक वेळ देणे
करिअर आणि नोकरीला प्राधान्य
आर्थिक स्थैर्य मिळाल्यानंतरच विवाह करण्याची मानसिकता
बदलती सामाजिक मूल्ये
वैयक्तिक स्वातंत्र्याला वाढते महत्त्व
अहवालानुसार, भारतात बालविवाहाच्या प्रमाणातही मोठी घट झाली आहे.
20 वर्षांपूर्वी विवाह करणाऱ्या महिलांचे प्रमाण
2005-06 : 72.4%
आता : 52.8%
15 वर्षांपूर्वी विवाह होणाऱ्या मुलींचे प्रमाण
पूर्वी : 11.9%
आता : 1.7%
यावरून मुलींचे शिक्षण आणि विवाहाबाबतची सामाजिक जाणीव वाढल्याचे दिसते.
हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक असल्याने अनेक तरुणांना योग्य जोडीदार मिळण्यात अडचणी येत आहेत. अहवालानुसार, भारतात महिलांच्या तुलनेत सुमारे 4.5 कोटी पुरुष अधिक आहेत. त्यामुळे विवाहयोग्य वयातील महिलांची कमतरता निर्माण होत असून त्याचा विवाहाच्या पद्धतीवरही परिणाम होत आहे.
NSO च्या अहवालातून भारतातील तरुणांची जीवनशैली आणि प्राधान्यक्रम बदलत असल्याचे स्पष्ट दिसून येतं. शिक्षण, करिअर आणि आर्थिक सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे विवाहाचे वय पुढे जात आहे. त्याचबरोबर बालविवाहात झालेली घट आणि बदलती सामाजिक मानसिकता हीदेखील या बदलामागील महत्त्वाची कारणे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आली आहेत.