नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात गेल्या २४ तासांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा ४३ हजार ३९३ वर पोहोचला. तर ४४ हजार ४५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गेल्या २४ तासांतील आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
आतापर्यंतचे कोरोना रुग्ण – ३ कोटी ७ लाख ५२ हजार ९५०
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २ कोटी ९८ लाख ८८ हजार २८४
ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ५८ हजार ७२७ इतकी आहे.
आतापर्यंत एकूण ३६ कोटी ८९ लाख ९१ हजार २२२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. ४० लाख २३ हजार १७३ जणांचे २४ तासांत लसीकरण करण्यात आले आहे.