राष्ट्रीय

समीर वानखेडेंना २२ मेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना २२ मेपर्यंत अटक करू नका, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.

एनसीबीने आपल्यावर ठेवलेले आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप करीत एनसीबीचे उपमहासंचालक ग्यानेश्वर सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी करीत वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या सुनावणीच्या वेळी दिल्ली सरकारने विनंती केली की, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करायला हवी. त्यावर न्या. विकास महाजन यांच्या खंडपीठाने वानखेडे यांना २२ तारखेपर्यंत अटक करू नये, असे आदेश देताना वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची परवानगीही दिली.

दरम्यान, आर्यन प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे. कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात आपल्याला समीर वानखेडे यांनी हेतुपुरस्सर गोवल्याचा आरोप मॉडेल मुनमुन धमेचा हिने केला आहे. ती म्हणाली की, मी मॉडेल आहे, माझे नाव आल्याने मीडियाचे या प्रकरणाकडे अधिक लक्ष जाईल, या हेतूने मला या प्रकरणात वानखेडे यांनी गोवले व गुन्हा दाखल केला. आतापर्यंत भीतीमुळे बोलले नव्हते; पण सीबीआयनेच वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल केल्याने बोलत असल्याचेही ती म्हणाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT