पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक कुटुंबातील ७० वर्षांवरील व्यक्तीला आता आयुष्मान योजनेचा (Ayushman Bharat Yojna) लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत उपचारासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (दि.11) या योजनेला मंजुरी दिली. सरकार यासाठी ३ हजार ४३७ कोटी रुपये खर्च करणार आहे. जाणून घेवूया आयुष्मान भारत आरोग्य योजना म्हणजे काय?, तिची उद्दीष्ट्ये, कोण पात्र ठरणार, अर्ज कसा करावा? याबाबत स.ििस्तर
जगातील सर्वात मोठी सार्वजनिक अर्थसहाय्यित आरोग्य विमा योजना मानली जाणारी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून सर्वसमावेशक आरोग्य सेवा प्रदान करेल. पात्र ज्येष्ठ नागरिकांना AB PM-JAY अंतर्गत नवीन वेगळे कार्ड दिले जाईल, ज्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेता येईल.
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) ही भारत सरकारने 2018 मध्ये सुरू केलेली एक प्रमुख आरोग्य विमा योजना, ज्याचा उद्देश समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना परवडणारी आरोग्य सेवा प्रदान करणे आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे, ज्याचे लक्ष्य 12 कोटी गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना आहे. या योजनेचे सुमारे 55 कोटी लाभार्थी समाविष्ट आहेत, जे भारतीय लोकसंख्येच्या सुमारे 40 टक्के आहेत.
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना: पात्रता निकष हे ग्रामीण आणि शहरी पुढीलप्रमाणे आहेत.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कुटुंबांसह आर्थिक दुर्बल घटक
16 ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती ज्यांना कुटूंब नाही
ज्या कुटुंबांमध्ये किमान एक शारीरिकदृष्ट्या विकलांग सदस्य आहे आणि सक्षम शारीरिक प्रौढ सदस्य नाही
अंगमेहनतीचे काम करून उदरनिर्वाह करणारी भूमीहीन कुटुंबे
आदिम आदिवासी जमाती
वेठबिगारी करणारी कुटूंबे
व्यवस्थित भिंती किंवा छप्पर नसलेल्या एका खोलीच्या तात्पुरत्या घरात राहणारी कुटुंबे
मैला साफ करणारे सफाई कामगार
भिकारी आणि भिकेवर जगणाऱ्या व्यक्ती
सामाजिक-आर्थिक जात जनगणना २०११ मध्ये उपस्थित व्यावसायिक श्रेणीतील शहरी कामगारांची कुटुंबे
राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना (RSBY) अंतर्गत नोंदणीकृत कुटुंबे
प्रथम Ayushman Bharat Yojna च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
"मी पात्र आहे का" विभागात प्रवेश करा
मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड भरा. नंतर ओटीपी वर क्लिक करा
ओटीपी भरा
त्यानंतर ओटीपी सत्यापित करा
आवश्यक माहिती द्या आणि "सबमिट करा" यावर क्लिक करा
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेसाठी अर्ज पुढीलप्रमाणे भरा
प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या
वेबसाइटवर गेल्यानंतर तुमचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड PMJAY पडताून बघा
कौटुंबिक ओळखीचे पुरावे सादर करा
युनिक AB-PMJAY ID सह तुमचे ई-कार्ड प्रिंट करा
हॉस्पिटलायझेशन, उपचार, निदान, औषधे, शस्त्रक्रिया आणि उपचारानंतरची काळजी यासारख्या खर्चाचा समावेश करून लाभार्थींना वार्षिक 5 लाखांच्या आरोग्य विमा आहे.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस सेवा आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांचा खिशातून होणारा खर्च कमी होतो.
लाभार्थींच्या कुटुंबातील सदस्य संख्या, वय किंवा लिंग यावर कोणतीही मर्यादा नाही
एखाद्या कुटूंबात ७० वर्षांवरील दोन ज्येष्ठ नागरिक असल्यास दोघांमध्ये विभागून ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य कवच मिळणार आहे
गरीब, मध्यम अथवा श्रीमंत कुटूंब असो, सर्व कुटूंबातील ज्येष्ठांना या योजनेचा लाभ होणार आहे
या योजनेमध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचे 3 दिवस आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसांचा खर्च, निदान आणि औषधांचा समावेश आहे
लाभार्थी कोणत्याही पॅनेल केलेल्या रुग्णालयात संपूर्ण भारतातील सेवांचा लाभ घेऊ शकतात.
नावनोंदणीच्या पहिल्या दिवसापासून, या योजनेंतर्गत आधीपासून अस्तित्वात असलेले सर्व आजार समाविष्ट केले जातात
ही योजना गंभीर आजारांमुळे आणि रुग्णालयात दाखल झाल्यामुळे होणारा आर्थिक भार कमी करण्यास मदत करते
या योजनेत डॉक्टरांची फी, रूम भाडे, डायग्नोस्टिक्स, आयसीयुमध्ये असल्यास त्याची काळजी आणि वैद्यकीय प्रत्यारोपणाच्या खर्चासह जवळपास 1,929 प्रक्रियांचा समावेश आहे.
या योजनेत खालीलप्रमाणे सर्व खर्च समाविष्ट आहेत,
वैद्यकीय तपासणी, उपचार आणि सल्ला
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीची काळजी (रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वी तीन दिवसांपर्यंत)
औषधे आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
नॉन-इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह केअर सेवा (ICU काळजी)
निदान आणि प्रयोगशाळा तपासणी
आवश्यक असल्यास वैद्यकीय रोपण
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर दरम्यान निवास आणि अन्न सेवा
उपचारादरम्यान उद्भवणारी गुंतागुंत
डिस्चार्ज मिळ्यानंतर १५ दिवसांपर्यंत वैद्यकीय काळजी