उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. File Photo
राष्ट्रीय

UP Flood: उत्तर प्रदेशातील 16 जिल्ह्यांत पूर; विविध दुर्घटनांत 6 जणांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

लखनौ : उत्तर प्रदेशातील नेपाळला लागून असलेल्या 16 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम असून, राप्ती नदी, बुढी राप्ती आणि कुनो या तीन नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत पाऊस, पुरामुळे विविध दुर्घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व 6 जण बुडून मरण पावले आहेत, असे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतर्फे सांगण्यात आले.

गोरखपूर, सिद्धार्थनगर आणि गोंडा जिल्ह्यात सर्वाधिक वाईट परिस्थिती आहे. बिहारमध्येही बेतिया, बगहा, सीतामढी, मधेपुरा, अररियासह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT