पुढारी ऑनलाईन डेस्क : " यंदा ऊन जरा जास्त आहे..." दरवर्षी उन्हाळा सुरु झालं की प्रत्येकाच्या तोंडी हे वाक्य असतं. आता देशातील विविध राज्यांमध्ये चैत्र महिन्यातच वैशाख वणवा जाणवत आहे. आपण या उन्हात गारवा शोधण्यासाठी काही कृत्रिम उपाय करतो. फॅन, कुलर आणि वातानुकुलित (एसी) यंत्रणा राबवून थंडावा निर्माण करताे. मात्र उन्ह्यात खर्या अर्थाने होरपळ हाेते ती मुक्या प्राण्यांची. आता तापमानात वाढ होत असताना तिरुचिरापल्ली येथील एमआर पलयम येथील हत्ती बचाव आणि पुनर्वसन केंद्रात हत्तींना थंडावा मिळावा यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.
तिरुचिरापल्ली येथील एमआर पलयम येथील हत्ती बचाव आणि पुनर्वसन केंद्र आहे. या केंद्रातील वन अधिकाऱ्यांनी हत्तींना थंड राहण्यास मदत करण्यासाठी शॉवर बाथ, मातीचे स्नान आणि स्विमिंग पूलची व्यवस्था केली आहे. याव्यतिरिक्त, तापमान नियंत्रित करण्यासाठी हत्तींच्या आश्रयस्थानांमध्ये ओव्हरहेड फॉगर बसवण्यात आले आहेत. प्राण्यांना हायड्रेटेड ठेवण्यासाठी टरबूजसारखी पाण्याने समृद्ध फळे देखील दिली जात आहेत.