प्रयागराज : गंगा आणि यमुना नद्यांच्या वाढलेल्या पाण्यामुळे संगम परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे प्रापंचिक साहित्यासह सुरक्षित ठिकाणी जाताना नागरिक. -
राष्ट्रीय

Heavy Rain | बिहारमध्ये अख्खी शाळाच वाहून गेली; हिमाचल-उत्तराखंडमध्ये ६ जणांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरूच आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सर्व शाळा बंद आहेत. रामबाग रेल्वेस्थानकाचे तीन ट्रॅकही पाण्यात बुडाले आहेत.

बिहारमधील बगहा येथे गंडक नदीच्या पाण्यामुळे तीव्र धूप होऊन प्राथमिक शाळेच्या ५ पैकी ४ खोल्या नदीत वाहून गेल्या. आता शाळेचा उरलेला भागही धूप होण्याच्या मार्गावर आहे. हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथे मंगळवारी मुसळधार पावसात दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ट्रकचालक आणि नेपाळमधील दोन मजुरांचा समावेश आहे. पावसामुळे ८८ रस्ते बंद आहेत. मंडीमध्ये सर्वाधिक ३२, कुल्लूमध्ये २५ आणि सिरमौरमध्ये १० रस्ते बंद आहेत.

दुसरीकडे, उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे दरड कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पाऊस आणि दरडी कोसळल्यामुळे १२४ रस्ते बंद आहेत. पिथौरागढमध्ये कुलागाड व्हॅली ब्रिजवर मोठे दगड कोसळले. त्यामुळे हा पूल काली नदीत कोसळला. परिणामी, कैलाश-मानसरोवर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT