निवडणुकीत आप उमेदवाराला आव्हान दिल्याबद्दल भाजप महिला खासदाराला नोटीस File Photo
राष्ट्रीय

निवडणुकीत आप उमेदवाराला आव्हान दिल्याबद्दल भाजप खासदाराला नोटीस

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्याला आव्हान देणाऱ्या आप नेते सोमनाथ भारती यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने भाजप खासदार बांसूरी स्वराज यांना नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांनी स्वराज यांना ३० दिवसांच्या आत याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने भाजप नेत्या खासदार बांसूरी स्वराज यांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. या नोटीसमध्ये 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत बन्सुरी स्वराज यांनी नोंदवलेल्या विजयाशी संबंधित प्रश्न आहेत. आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे सोमनाथ यांनी बांसूरी यांच्या विजयाला आव्हान दिले होते.

याचिकेत सोमनाथ भारतीशिवाय बसपचे राज कुमार यांचेही नाव होते. मात्र न्यायालयाने राज कुमार आनंद यांचे नाव याचिकेतून काढून टाकले आहे. त्यांचे नाव काढून टाकण्याचे कारण राज कुमार यांना मिळालेल्या मतांची संख्या देण्यात आली आहे. राज कुमार यांनी निवडणूक लढवली नसती तरीही सोमनाथ यांना मिळालेल्या मतांनी विजय मिळाला नसता, असे न्यायालयाने म्हटले आहे.

बसपाच्या राज कुमार यांना फक्त ५२६९ मते मिळाली आहेत. तर भारती बांसूरी स्वराज यांना त्यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. सोमनाथ भारती यांना ३७४८१५ तर स्वराज यांना सर्वाधिक ४५३१८५ मते मिळाली. मात्र, राज कुमार आनंद यांचा बसपाच्या जागेवरून निवडणूक लढवण्याचा उद्देश स्वराज यांना विजय मिळवून देण्याचा होता, असा आरोप सोमनाथ भारती यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT