Hathras stampede | मृत्यू अटळ, कुणीही रोखू शकत नाही : भोले बाबा File Photo
राष्ट्रीय

Hathras stampede| मृत्यू अटळ, कुणीही रोखू शकत नाही : भोले बाबा

पुढारी वृत्तसेवा

लखनौ : हाथरस दुर्घटनेनंतर स्वयंघोषित भोले बाबा याने मृत्यू अटळ असून त्याला कुणीही रोखू शकत नसल्याचे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. उत्तर प्रदेशातील सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२१ भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महिला आणि बालकांचा समावेश होता.

उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीत भोले बाबा याच्या वाहनाच्या ताफ्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपासून पोलिसही त्याच्या मागावर आहेत. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला की, जे होणार आहे, त्याला कुणी टाळू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT