बिहार विषारी दारु प्रकरण; मृतांचा आकडा २६ वर  File Photo
राष्ट्रीय

बिहार विषारी दारु प्रकरण; मृतांचा आकडा २६ वर

Bihar Hooch Tragedy : बेकायदेशीर दारू व्यापारात झपाट्याने वाढ

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारमधील  लकडीगंज परिसरातील विषारी दारु प्रकरणातील मृतांचा आकडा हा २६ वर गेला आहे. आतापर्यंत २० जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे .(Bihar Hooch Tragedy ) 

बिहारमध्ये दारूबंदी लागू झाली असली तरीही लोक तिथे दारु पीत नाहीत असे नाही, दारु पिणाऱ्यांचे प्रमाणही आहे. दरम्यान बिहारमध्ये लकडीगंज परिसरातुन  विषारी दारू घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २० जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिहारमध्ये बेकायदेशीर दारूचा व्यापार झपाट्याने वाढत असून सर्वसामान्य नागरिक त्याचे बळी ठरत आहेत. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासन व प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT