हिमाचल प्रदेशात ढगफुटी ४५ जण वाहून गेले, १३ मृतदेह सापडले  Pudhari
राष्ट्रीय

हिमाचल प्रदेशात ढगफुटी ४५ जण वाहून गेले, १३ मृतदेह सापडले

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशातील समेज आणि बागी पुलांजवळ बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीत ४५ जण वाहून गेले. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंत १३ मृतदेह सापडले आहेत. राज्यात सुर असलेल्या संततधार पावसाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. (Himachal Pradesh Cloudburst)

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) १४ व्या बटालियनचे कमांडंट बलजिंदर सिंग यांनी म्हटले आहे की, ऑपरेशन्समध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी बचाव पथकांची तयारी आणि वेळेवर तैनाती आवश्यक आहे. "यावर्षी एनडीआरएफच्या पथकांना हिमाचल प्रदेशातील दुर्गम ठिकाणी पाठवण्यात आले होते; जेणेकरून बचाव कार्यात कोणताही विलंब होऊ नये. समेमधील ढगफुटी ही एक मोठी आपत्ती आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT