Ministry of MSME: खादी, ग्रामोद्योग क्षेत्र 
Latest

Ministry of MSME: खादी, ग्रामोद्योग क्षेत्रातील रोजगारात ३६ टक्क्यांची वाढ; एमएसएमई मंत्रालयाचा दावा

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करवून देण्याचे प्रमुख उदिष्ट खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) आहे. उदिष्टपुर्तीच्या अनुषंगाने गत ९ वर्षात रोजगार निर्मितीत ३६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आल्याचा दावा सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाने केला आहे.

२०१३-१४ या आर्थिक वर्षात या क्षेत्रात एकत्रित रोजगार १ कोटी ३० लाख ३८ हजार ४४४ एवढा होता. २०२२-२३ मध्ये यात ३६ टक्क्यांची वाढ नोंदवत ही संख्या १ कोटी ७७ लाख १६ हजार २८८ वर पोहोचली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात निर्माण झालेल्या ५ लाख ६२ हजार ५२१ नवीन रोजगार संधीच्या तुलनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७०% वाढीसह एकूण ९ लाख ५४ हजार ८९९ रोजगार संधी निर्माण झाल्याचा दावा सरकारने केला आहे.

विशेष म्हणजे गत ९ वर्षांमध्ये ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेल्या स्वदेशी खादी उत्पादनांच्या विक्रीने ३३२ टक्क्यांची अभूतपूर्व वाढ नोंदवली असल्याचे देखील सरकारने सांगितले आहे.आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये आयोगाची उलाढाल ३१,१५४ कोटी रुपये होती. २०२२-२३ मध्ये आयोगाने १,४३,६३० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल केली. दरम्यान ग्रामीण भागांमध्ये ९,५४,८९९ नवे रोजगार निर्माण करण्यात आले.

आर्थिक वर्ष २०१३-१४ ते आर्थिक वर्ष २०२२-२३ या कालावधीत केव्हीआय उत्पादनांच्या निर्मितीमध्ये २६८% ची वाढ झाली तर या उत्पादनांच्या विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढत या उत्पादनांच्या विक्रीने तब्बल ३३२% ची वाढ नोंदवली असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT