संग्रहित छायाचित्र 
Latest

मंत्रालय आजपासून पाच दिवस बंद

मोहन कारंडे

मुंबई : राज्य सरकारने अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) बरोबर शुक्रवारी ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) ची सरकारी सुट्टी जाहीर केल्याने मंत्रालय आता २ ऑक्टोबरपर्यंत सलग पाच दिवस बंद राहणार आहे.

अनंत चतुर्दशीची स्थानिक सुट्टी असल्याने मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सरकारी कार्यालये बंद असणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) आणि ईद-ए-मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे २८ तारखेला आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागांत गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद-ए-मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणार्‍या मिरवणुकांमुळे पोलिस यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने २९ सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ३० सप्टेंबरला शनिवार, १ ऑक्टोबर रविवार आणि सोमवारी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT