वर्धा; पुढारी वृत्तसेवा : सत्ताधार्यांकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. महागाईने लोक त्रास्त आहेत. पण सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे. सत्तेचा उपयोग लोकांचे दुःख दूर करण्यासाठी असते, याचे भान सत्ताधार्यांना नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. शेती उद्ध्वस्त होत आहे. पण त्याकडे कोणी पाहायला तयार नाही. कापूस उत्पादक संकटात आहे. सोयाबीनबाबतही तीच परिस्थिती आहे. सरकारचे शेती, उद्योग, बेरोजगारीकडे लक्ष नाही, असा आरोप पवार यांनी केला.