वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तीन दिवसानंतर आढळला file photo
यवतमाळ

यवतमाळ : वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तीन दिवसानंतर आढळला

पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ : शेतात जात असल्याचे सांगून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तीन दिवसांनंतर नाल्यात आढळून आला. ही घटना रविवारी (दि.१५) रोजी नेर तालुक्यातील ब्राह्मणवाडा शिवारात उघडकीस आली. अरुण तुकाराम राऊत (वय ६०, रा.मांगलादेवी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

अरुण राऊत या शेतकऱ्याची ब्राह्मणवाडा शिवारात शेती आहे. ते शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर ) रोजी दुचाकीने शेतात गेले होते. रात्र होऊनही ते घरी परतले नाही. यानंतर नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. शनिवारी या प्रकाराची तक्रार नेर पोलिसात करण्यात आली.

रविवारी दुपारी ब्राह्मणवाडा पूर्व मार्गावर असलेल्या एका खड्ड्यात गुराखी गजानन बोरकर यांना दुचाकी पडलेली आढळली. त्याचठिकाणी कुजलेला मृतदेह दिसून आला. याची माहिती दिल्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. यानंतर मृतदेह अरुण राऊत यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT