नागपूर : पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची बातमी महाराष्ट्रातील वास्तव आहे. लाडकी बहीण म्हणून मिरवणाऱ्या महायुती सरकारला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे. आता तरी मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुली आज महाराष्ट्रात सुखरूप नाही. तिथे शेतात, नोकरीवर जाणाऱ्या सामान्य आई वडिलांच्या मुली दररोज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय ‘स्ट्रगल‘ करत असतील आणि किती मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत असेल हा अंदाज महायुतीतील मंत्र्यांना नाही. आरोपींना पकडण्यासाठी मंत्र्यांना थेट पोलिस स्टेशन गाठावे लागले. आम्ही कधीपासून सांगत आहोत राज्यात पोलिसांचा धाक राहिला नाही. कारण गुंडाना महायुतीचे राजकीय संरक्षण मिळते. असेही वडेट्टीवार म्हणाले.