Vijay Wadettiwar  Pudari
नागपूर

Nagpur news | महामानवांच्या विचारांप्रती सरकारची अनास्था... वडेट्टीवार यांचा आरोप

वेळकाढूपणा थांबवा, जनतेची दिशाभूल थांबवा ! असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : इंदू मिल येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महामानवांच्या विचारांप्रती सरकारची ही अनास्था असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

आखाती युद्धाचे कारण पुढे करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम रखडणे दुर्दैवी आहे. देशातील इतर सर्व प्रकल्पांसाठी निधी आणि साहित्य मिळते, मग महामानव डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकालाच विलंब का? नोव्हेंबर २०२६ पर्यंतची मुदतवाढ म्हणजे केवळ सरकारचा वेळकाढूपणा आहे.

केवळ या एकाच प्रकल्पासाठी दिलेले तांबे आणि एलपीजी टंचाईचे कारण पटण्यासारखे नाही. कोट्यवधी अनुयायांच्या भावनांची ही थट्टा आहे. वेळकाढूपणा थांबवा, जनतेची दिशाभूल थांबवा ! असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT