नागपूर : शिक्षण क्षेत्रात खळबळ माजवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी घडामोडी घडली आहे. या घोटाळ्यात अडकलेल्या १५ मुख्याध्यापकांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश बुलबुले यांनी आज फेटाळून लावला. यामुळे या सर्वांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.