नागपूर, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि.31) रात्री उशीरापर्यंत दक्षिण भारतातून देशाची राजधानी दिल्लीला जाणारी अनेक विमाने नागपुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आली होती.दुसरीकडे दिल्लीवरून नागपुरात येणाऱ्या विमानांना रायपूर, इंदोरच्या दिशेने वळविण्यात आली.
यामुळे साहजिकच दिल्ली नागपूर असा प्रवास करणाऱ्या आणि नागपुरात निर्धारित वेळेत पोहचण्यासाठी आतुर असलेल्या हवाई प्रवाशांना इंदोर विमानतळावर प्रतीक्षा करीत ताटकळत बसावे लागले. रात्री उशिरापर्यंत मग त्यांना नागपुरात आणले जाणार असल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली. यामुळे दिल्लीतल्या वाईट हवामान, मुसळधार पावसाचा नागपूर आणि दक्षिण भारतातील हवाई प्रवाशांना चांगलाच फटका बसला.