नागपूर

चंद्रपूर : वेगळ्या विदर्भासाठी महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर आंदोलन

backup backup

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आज 8 फेब्रुवारीला महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक व माजी आमदार वामनराव चटप यानी केले.

गुरुवारी दुपारी गोंडपीपरी तालुक्यातील महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पोळसा पुलावर माजी आमदार वामनराव चटप व कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करुन विविध मागन्या लावुन धरल्या. यामध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, विजेची दरवाढ तात्काळ राज्यशासनाने मागे घ्यावी, शेती पंपाला दिवसा लोडशेडिंग बंद करावी, विदर्भात येणारे 2 औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाच्या बाहेर न्यावे, वैधानिक विकास महामंडळ नको विदर्भ राज्य हवे, अन्न धान्यावरील GST रद्द करावी, बल्लारपूर-सुरजागड रेल्वे मार्गाला मंजुरी देत निधी उपलब्ध करावा, बडनेरा – कारंजा – मंगरुळपीर – वाशिम रेल्वेमार्गास केंद्र सरकारने तात्काळ मंजूरी प्रदान करुन निधी उपलब्ध करून द्यावा, आर्वी – पुलगांव (शकुंतला) रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये तात्काळ रुपांतर करण्यात यावे,  इतर वन्य प्राण्यांप्रमाणे सर्पदंशाने मृत्यु धारकांचे वारसदारांना आर्थिक मदत देण्यात यावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड मध्ये धानाला हमीभावा पेक्षा ४०% जास्त भाव देवून तर मध्यप्रदेशात गव्हाला हमी भावापेक्षा ३०% जास्त भाव देवून खरेदी करण्याची " मोदी गॅरंटी " ची घोषणा केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कापूस व सोयाबीन ला हमीभावापेक्षा ३०% जास्त दर देवून खरेदी करावी, ज्यांनी विक्री केली आहे. त्यांना वाढीव रक्कम त्यांचे बैंक खात्यात जमा करावी आदी विविध मागण्याकरीता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT