नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थान देवगिरी येथे माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांचे आज (दि. ८) निवेदन दिले. माथाडी कामगार कायद्यात संशोधन करण्याच्या नावाखाली माथाडी कामगारांना संपविण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला.
माथाडी कायद्यात संशोधन करण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले असून हिवाळी अधिवेशनात ही समिती आपला निर्णय घेणार आहे. या संशोधनाच्या नावावर माथाडी कामगार कायदा संपुष्टात येणार आहे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बजरंग सिंह परिहार यांनी दिली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे, राजीव सिंग चौहान, दिलीप पणकुले, शहर अध्यक्ष दूनेश्वर पेठे, नूतनताई रेवतकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, माथाडी समाजबांधव आदी उपस्थित होते.
हेही वाचा