भंडारा: भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात येणार्या शेतीच्या जागेवर शेतकर्यांशी गावपातळीवर चर्चा न करता सिमेंट काँक्रिटचे पोल उभे करण्यात आल्याने, भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्गाला अनेक शेतकर्यांनी विरोध दर्शवित मागण्यांचे निवेदन लाखांदूर तहसीलदारांमार्फत भूसंपादन अधिकार्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की भंडारा ते गडचिरोली समृद्धी महामार्ग हा लाखांदूर तालुक्यातील काही गावांतून जात असल्याने येथील शेतकर्यांच्या शेतीची जागा संपादित केली जात आहे. अशात, याच तालुक्यातील सरांडी- बु येथील. सोबतच दिलेल्या निवेदनावर विचार करून सर्व शेतकरऱ्यांची तातडीची बैठक सरांडी/बु ग्राम पंचायत कार्यालयामध्ये लावावी, अशी मागणी सुद्धा या निवेदनातून केली आहे.
शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता किंवा माहिती न देता काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर सिमेंट काँक्रिटचे पोल उभे करण्यात आले. रस्ते बांधकामासाठी शेतकर्यांची जागा हवी असल्यास त्यानुसार संबंधित शेतकर्सोबत गावपातळीवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे निवेदनातून म्हटले आहे. मात्र, भूसंपादन कार्यालयामार्फत असे न करता या महामागार्साठी या गट क्रमांकामधून शेती भूसंपादन तातडीने करणार असल्याचे परिपत्रक लावून जाहीर करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, संबंधित विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या यादीमध्ये ज्यांचे गट क्रमांक नाही, आराजी नाही, नाव सुद्धा नाही अश्यांच्याही शेतामध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रिटचे खांब उभे करण्यात आले आहेत. या विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून, ही शेती भंडारा गडचिरोली महामार्गाची संपादित करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे येथील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
त्यामुळे, सरांडी/बु शेत शिवारातील जी शेती भूसंपादन विभाग महामागार्साठी निर्गमित करीत असल्याचा निर्णय अयोग्य असल्याचे मत मांडत येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असल्याच्या आशयाचे निवेदन सरांडी/बु येथील शेतकऱ्यांनी भसंपादन अधिकाऱ्यांन दिले आहे