मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृ्त्यू Pudhari File Photo
भंडारा

भंडारा : मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

भंडारा : मधमाशांच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा येथे उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.11) सकाळी घडली. शेतामध्ये पाहणी करायला गेलेल्या शेतकऱ्यांवर मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. रवींद्र महादेव माथूरकर (वय.५२ रा. पवनी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

रविंद्र हे मोहरी येथील शेतात धान पिकातील निंदन काढण्याकरिता गेलेल्या मजुरावर लक्ष ठेवण्यासाठी गेले होते. बांधावर बसलेल्या रविंद्र यांच्यावर अचानक उडत जात असलेल्या मधमाश्यांनी हल्ला केला. त्याच्या संपुर्ण शरिरावर मधमाशांनी चावा घेतला. यावेळी कामावर असलेल्या महिलांनी तेथून पळ काढला. यावेळी मधमाशांच्या हल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रविंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद पवनी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT