ठाणे

खासदार राहुल गांधींवरील दाव्याची १ एप्रिलला सुनावणी 

दिनेश चोरगे

भिवंडी; पुढारी वृत्तसेवा :  खासदार राहुल गांधी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत वक्तव्य केले की, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केली. यामुळे आरएसएसची बदनामी झाल्याचे सांगत राहुल गांधी यांच्या विरोधात आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर शनिवारी भिवंडी जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन या दाव्याची सुनावणीसाठी पुढील १ एप्रिल रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एल. सी. वाडीकर यांनी सुनावणीवेळी दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना सांगितले.

भिवंडी न्यायालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडीतील पदाधीकारी राजेश कुंटे यांनी काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला. त्या मानहानी बाबतच्या दाव्याची शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान फिर्यादी राजेश कुंटेतर्फे अॅड. नंदू फडके यांनी बाजू मांडली, तर खासदार राहुल गांधी यांची बाजू अॅड. नारायण अय्यर यांनी मांडली आहे. राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी सांगितले की, खासदार राहुल गांधी दिल्लीचे रहिवासी असून लोकसभा सदस्य आहेत, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत वकील त्यांचे प्रतिनिधित्व करतील आणि खटला पुढे चालवतील, या आधारावर कायमस्वरूपी सूट मिळावी म्हणून न्यायालयात युक्तिवाद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT