कशेडी बोगद्यातील मोठी गळती ‘ग्राऊटींग’च्या सहाय्याने थोपवण्यात आल्याने गणेश भक्तांवरील धोक्याची टांगती तलवार दूर होऊन प्रवास सुखकर होत आहे.द्यातील मोठी गळती ‘ग्राऊटींग’च्या सहाय्याने थोपवण्यात आली pudhari news network
ठाणे

ठाणे : नवे तंत्र वापरून कशेडी बोगद्यातील गळती थोपवणार

पुढारी वृत्तसेवा

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगदा ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे चर्चेत आला होता. बोगद्यातील मोठी गळती ‘ग्राऊटींग’च्या सहाय्याने थोपवण्यात आल्याने गणेश भक्तांवरील धोक्याची टांगती तलवार दूर होऊन प्रवास सुखकर होत आहे. वाहनांची रहदारी कमी होताच लहान गळती रोखण्यासाठी नव्या तंत्राचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

जुलै महिन्यात सतत आठवडाभर झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे कशेडी बोगद्यात ठिकठिकाणी गळतीचे सत्र सुरू झाले होते. राष्ट्रीय महामार्ग खात्याने गळती थोपवण्यासाठी ग्राऊटींगचा वापर केला होता. मात्र तरीही गळती थोपवण्यात अपयश आल्याने राष्ट्रीय महामार्ग खात्याची डोकेदुखी वाढली होती. वाहनचालकांनाही जीव मुठीत धरून बोगद्यातून मार्गस्थ व्हावे लागत होते. ऑगस्टअखेरीस राष्ट्रीय महामार्ग खात्याने कामगारांची जादा फौज तैनात करत गळती नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्यांची निर्मिती केली आहे. यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. यामुळे तळ कोकणात जाणार्‍या आणि मुंबईकडे येणार्‍या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून कशेडी बोगद्याला गळती लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशी आणि वाहनचालक धास्तावले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT